Skip to main content

गुरुवाणी हवी, गुरुबाजी नको

 गुरुवाणी हवी, गुरुबाजी नको


पुणे मेट्रो लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी  (९८ ५०८ ३० २९०)


५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी

ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)

prasad.kulkarni65@gmail.com


   सोमवार ता. ३ जुलै २०२३ रोजी गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा आहे.मानवी संस्कृती गुरुचे महत्व नेहमीच अन्यासाधरण राहिलेले आहे. जीवनात मार्गक्रमण करत असताना समस्यांना भिडण्यासह जीवन जगण्याची कला गुरु शिकवत असतात. भारतीय दर्शन परंपरेत आणि संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च मानलेले आहे. बालकाचे पहिले गुरु हे त्याचे आई-वडील असतात. मात्र त्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक गुरु कारणीभूत ठरत असतो व प्रेरणादायी ठरत असतो. एक चांगला नागरिक बनवण्याचे काम गुरु आपल्या संस्कारातून करत असतात

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा 

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः

अशी गुरुची व्याख्या भारतीय संस्कृतीने केलेली आहे.आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरूंच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्याचा,त्यांच्यापुढे विनम्रतेने नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. कारण महाभारत लिहिणाऱ्या व्यासांचा जन्म या पौर्णिमेलाच झाला होता. 

ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घे तू' असे व्यास ऋषी बद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

आज अनेकजण गुरुची माती सांगणारे लेख लिहितील.ते लिहिलेही गेले पाहिजेत या तीळमात्र शंका नाही.कारण शेवटी व्यक्ती घडवण्यामध्ये गुरु दिशादर्शक ठरत असतात. पण आजच्या वर्तमानात गुरुवाणी पेक्षा गुरुबाजी फार वाढलेली आहे. त्यातून सत्यार्थ प्रकाश मिळत नाही तर ढोंगबाजी दिसून येते. म्हणूनच आपल्या संतांनी या ढोंगीगुरुबाजी बाबत काय म्हटले आहे ते आज समजून घेण्याचा दिवस आहे. तोच खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेचा संदेश ठरेल.

अध्यात्मिक आणि सामाजिक जीवनामध्ये आपल्याकडे गुरुसंस्था परंपरागत अस्तित्वात आहे. हे कार्य असाधारण अथवा दुर्लक्षित करण्यासारखे नाही. तरीही संताना मात्र गुरुबाजीतील अनिष्ट  प्रकारांची चाहूल लागलेली होती. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ 'विवेकसिंधू 'पासून तुकारामांच्या अभंगापर्यंत भौंदूगिरीचा बुरखा फाडणारी अनेक उदाहरणे संत साहित्यात दिसून येतात.ढोंगी गुरुबाजी पासून दूर राहण्याचा संतांचा विचार आजच्या काळात जोपासणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण मोठमोठ्या राष्ट्रीय नेत्यापासून अगदी सर्वसामान्य कामगार वर्गापर्यंत अनेक जण या भोंदू गुरुजींच्या चक्रात गुरफटून गेले आहेत. जीवनाच्या इतर अंगापेक्षा पारंपारिक जीवनात चटकन प्रविष्ट होऊन आयुष्याचे सार्थक करू पाहणाऱ्या अनेक मंडळीत गुरूच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाने अथवा अन्य गोष्टींच्या देखाव्यामुळे भारावून जाण्याने गुरुच्या पात्रापात्रतेचा विचार करण्याची शक्ती नष्ट झालेली असते. त्यामुळे साधुत्वाचे बाह्य अवडंबर माजवून आपण कोणाचाही उद्धार करायला समर्थ आहोत असे ठामपणे (?) सांगणाऱ्या भोंदू गुरूंचा सुळसुळाट आज समाजात वाढलेला आहे. ही मंडळी सर्वसामान्य माणसाच्या श्रद्धेशी खेळत असतात आणि आपली दुकानदारी चालवत असतात. गावोगाव चालणाऱ्या सप्ताह आणि पारायणापासून टीव्हीच्या अनेक चॅनेल पर्यंत हे सर्वत्र दिसून येते. एकीकडे स्वयंघोषित गुरूंची संख्या वाढत आहे आणि दुसरीकडे सामाजिक बकालपण वाढत आहे.हे दोन्ही एकाच वेळी घडत आहे .अस्वस्थ वर्तमानाचे हेही एक कारण आहे.

संतवाङ्मयात सद्गुरु म्हणजेच महामानव असे सांगितले गेले आहे. आद्य ग्रंथकार मुकुंदराज यांनी विवेकसिंधूत म्हटले आहे की, ज्याच्या ठायी समबुद्धीचा प्रकर्ष झाला आहे त्याला सद्गुरु म्हणावे. संत ज्ञानेश्वरांनी गुरुची योग्यता पासून घ्यावी असे सांगितले आहे. एकनाथांनी तर अशा भोंदू गुरुबाजांवर चांगलाच प्रहार केला आहे. केवळ काढाऊ वृत्ती, धनाचा लोभ आणि स्वतःचे स्तोम माजवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न हीच लक्षणे आजकालच्या तथाकथीत गुरूंमध्ये दिसत असतात.असे हे गुरु स्वतःच चंगळबाज असतात मग त्यांच्यापासून परमार्थ काय शिकणार ? लोभी गुरुपासून घडला तर पारमार्थिक अपघातच घडेल असे सांगताना एकनाथी भागवतात ते म्हणतात,

जे का अपेक्षूनिय वित्त , चतुवर्ण उपदेशीत

ते धनलोभे लोलुप पथ,नाही घेईजेत गुरुत्वे l

जेथ गुरूशिष्य सलोभता, तेथे शिष्याची बुडे विरक्तता

ऐशिया ठायी उपदेश घेता ,परमार्थता अपघात !!

असा परमार्थिक अपघात घडवणाऱ्या ढोंगी गुरुची हजेरी घेताना एकनाथ पुढे म्हणतात ,

अंगा लावूनिया राख, करी भलतेची पाप 

मेळवी शिष्यांचा मेळा,अवघा भांगेचा घोटाळा,

नामा परी सांगे मंत्र ,नेणे विधी अपवित्र

 नकळे ज्ञानाची हातवटी,सदा परदार रहाटी

 एका जनार्दनी सोंग,तेथे नाही पांडुरंग !!

अंगाला राख फासून स्वतःला संन्याशी म्हणवून घेणारी अनेक ढोंगी मंडळी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन सर्वसामान्य माणसाला लुबाडत असतात हे एकनाथांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

एकनाथां प्रमाणेच संत नामदेवानीही  भोंदू गुरुविरोधात लेखणी झिजवली आहे. जगाला सांगे ब्रह्मज्ञान ,आपण कोरडे पाषाण असणारे हे लोक टीपे टोपी माळा असली भक्ती शिकवतात. ही खोटी कर्मकांडी भक्ती म्हणजेच कांचनिक भक्ती आहे असे संत नामदेव म्हणतात.

कांचनिक भक्ती सर्वकाळ करी, बहुतांंचे वैरी हीत नेणें 

लोकांपुढे सांगे आम्ही हरिभक्त,न होय विरक्त स्थिती त्याची !!

असे सांगून संत नामदेव एका अभंगात म्हणतात,


पोटासाठी जरी करी हरीकथा, जन रंजविता फिरतसे 

तेणे केला घात एकोत्तर शतकूळाचा ,पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर,

 द्रव्याचीये आशे हरिकथा करी ,तया यमपुरी नित्यवास

  नामा म्हणे ऐसे होते जे रे कोणी, ते नर नयनी पाहू नये !!

संत तुकारामांनी तर अशा गुरूंबाबत ' मुखे सांगे ब्रह्मज्ञान ,जनलोकांची कापितो मान ' असेच म्हटले आहे .

तुकारामांनी अनेक अभंगातून या भोंदुंची चांगलीच रेवडी उडवली आहे. ते म्हणतात,

डोई वाढवले केश, भुते आणीती अंगास

तरी ते नव्हती संतजन ,तेथे नाही आत्मखुण,

मेळवून नरनारी, शकुन सांगती नानापरी

 तुका म्हणे मैंद, नाही त्यापासी गोविंद 

 दया धर्म चित्ती नाही, ते जाणावे भोंदुजन !!

नशेबाजी आणि पोटासाठी चाललेली ही भोंदूगिरी आहे संत तुकाराम म्हणतात.

कली युगी घरोघरी, शब्द झाले फार

 वितभर पोटासाठी, हिंडती दारोदार 

 .......ऐसे  संत जाले कळी ,तोंडी तमाखूची नळी 

 स्नानसंध्या बुडविली , पुढे भांग वोडवली,

 भांग भूर्का हे साधन,पची पडे मद्यपान

 तुका म्हणे अवघे सोंग, तेथे पैसा पांडुरंग !!

भिकेचे डोहाळे लागलेले जुने लागीर वाणी असते असे संत तुकाराम म्हणतात. पोटासाठी गुरुबाजीचा बाजार मांडणारी मंडळी स्वतः अतिशय अज्ञानीअसतात मग त्यांच्याकडून दुसऱ्यांना ज्ञान काय मिळणार? अर्थ न कळणाऱ्या व नुसती घोकंपट्टी अथवा पोपटपंची करणाऱ्यांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात,

अर्थाविना पाठांतर कासया करावे, व्यर्थ ची मरावे घोकुनिया

 घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे, अर्थरूप राहे होऊनिया

 तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी, नाही तरी गोष्टी बोलू नका !!

तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनीही ढोंगी गुरूंच्या संदर्भात अनेक अभंग लिहिलेले आहेत.बहिणाबाई म्हणतात ,जे गुरु स्वतःच काम,क्रोध, लोभ, द्वेष यांच्या आहारी गेले आहेत ते इतरांना कसले मार्गदर्शन करणार ?ज्यांच्याकडे सदसदविवेक बुद्धी नाही ते इतरांना सुखी कसे ठेवणार ?जे स्वतःच मायेच्या मोहाने ग्रासले आहेत ते इतरांना या मोहपाशातून काय बाहेर काढणार ?

संतांनी असे ढोंगी गुरूबाजी वर कोरडे ओढलेले आहेत .तरीही या समाजात धनलोभी व स्वार्थी असे अनेक विषयासक्त गुरु संतवाणीचे प्रवचन ,कीर्तन आपल्या सोयीनुसार रंगवून सांगताना दिसतात.तसेच भोळ्या भक्तांना पारमार्थिक सुखाचे आमिष दाखवून ज्ञानेश्वरी पासून दासबोधापर्यंतच्या ग्रंथांची पारायणेही करून घेतात. ही पारायणे त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठीच असतात.संतवाङ्मयाचा आशय समजून न घेता आणि संतांच्या चळवळीचा अर्थ न समजल्याने या पारायणातून भक्तांच्याही हाती काही पडत नाही. संतांनी काय सांगितले आणि हे तथाकथित गुरु काय सांगत आहेत याचा विचार शिष्य,अनुयायी मंडळी करतच नाहीत.

ज्ञातेपणाचा आभास निर्माण करणारी ही ढोंग बाजी  समाजाला लागलेली कीड आहे असे म्हणावे लागेल. अशी अनेक ज्ञातेपणाचा आव आणणारी माणसे संतवाणीचे  स्वतःच्या बुद्धीनुसार निरूपण करून माऊली, सद्गुरु, महाराज वगैरे प्रकारची विशेषणा लावून समाजाचे शोषण  करतांना दिसतात .त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. खरे गुरु आपला शिष्य सुद्धा परीक्षेतून पारखून घेतात.तर हे भोंदू गुरु दिसेल त्याला आपला शिष्य करायला स्वतःच धावतात. मारून मुटकुंन शिष्यत्व पत्करायला लावण्याचाच हा प्रकार आहे. असे गुरु एखाद्याची इच्छा नसली अथवा तो दुसऱ्या एखाद्याला गुरु मानत असला तरीही त्याच्यापेक्षा मीच कसा' पावरफुल्ल ' गुरु आहे असे सांगून आपला गंडा बांधण्याचा आग्रह धरतात .त्यामुळे गुरु करायचा असेल तर त्याची निवडही पात्रापात्रतेच्या विचारानेच केली पाहिजे. पूर्वी सरदारांच्या जवळ जसे त्यांचे हुजरे असत तसे या तथाकथित महाराजांजवळ त्यांची शिष्य मंडळी असतात.अशा एकूणच पार्श्वभूमीवर संतांनी आपल्या वाङ्मयातून ढोंगी गुरुबाजीवर हल्ला चढवला. त्यातून आपण कोणता बोध घ्यायचा आणि त्याचा प्रसार व प्रचार कसा करायचा याचा गांभीर्याने विचार करायला हवा. कारण आज अशा गुरूंचे रूप लाखोंच्या संख्येने असलेल्या बैरागी, गोसावी ,जोगी ,साधू ,साध्वी, योगी यांनी घेतलेलेआहे. हे लोक समाजात दारिद्र्य ,आळस ,अज्ञान आणि व्यसने यांची मोठ्या प्रमाणात वाढ करतात.तरीही लोक त्यांच्या आशीर्वाद मागत असतात. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवाणी आणि गुरुबाजी यातील फरक समजून घेण्याची नितांत गरज आहे.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत.तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Comments

Popular posts from this blog

पेठवडगाव : श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप,संचलित,”कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड) पेठ वडगांव”येथे “एक दिवसीय TET,CTET,TAIT कार्यशाळा” संपन्न

पुणे मेट्रो लाईव्ह : पेठवडगाव : श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप,संचलित,”कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड) पेठ वडगांव”येथे “एक दिवसीय TET,CTET,TAIT कार्यशाळा” आयोजित केली होती या या कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते  प्र.प्राचार्य.श्री.सचिन शिवाजी पाटील(कै.रामराव निकम शिक्षणशास्त्र महाविद्यालय,इंदोली) होते. या कार्यशाळेच्या वेळी कॉलेजच्या प्र.प्राचार्या.सौ.निर्मळे.आर.एल(कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड),पेठ वडगांव) आणि प्र.प्राचार्य.भोसले.एस.एम(इचलकरंजी शिक्षणशास्त्र महाविद्यालय इचलकरंजी) उपस्थित होते.    कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राध्यापक सोरटे एस के यांनी केले.कार्यशाळेमध्ये प्र.प्राचार्या.श्री. सचिन शिवाजी पाटील सरांनी स 'TET,CTET आणि TAIT 'या परीक्षां विषयी  बी.एड.च्या छात्राध्यापकांना मार्गदर्शन केले. परीक्षेच्या वेळी प्रश्न सोडविताना येणाऱ्या अडचणीवर मार्ग कसे काढावेत हे सांगितले.  तसेच प्रश्न सोडवण्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना येणाऱ्या शंकांचे निरसन त्यांनी केले.या कार्यक्रमाच्या वेळी प्रा. सोरटे, प्रा. शिरतो...

बेकायदेशीर व अवैध व्यवसाय धंदे , लोकांना होणारा त्रास व गुंडगिरीबाबत कठोर कारवाई होणे बाबत पुजारी मळा येथील नागरिकांचे निवेदन.

 संदेश राजाराम हत्तीकर, संतोष राजाराम हत्तीकर,राजाराम हरीबा हत्तीकर व अली खान यांचे वर कारवाई  करण्याची मागणी. पुणे मेट्रो लाईव्ह :  इचलकरंजी  येथील  श्री. संदेश राजाराम हत्तीकर, संतोष राजाराम हत्तीकर,राजाराम हरीबा हत्तीकर व अली खान यांनी पुजारी मळा, वॉ.नं. १७ शिवशक्ती चौक, झपाटे दवाखान्याजवळ, इचलकरंजी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर  पुजारी मळा परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने हत्तीकर यांचे सदर परिसरात दारूच्या बाटल्या स्वच्छ करणेचे केमिकल गोडाऊन असून सदर गोडाऊन मध्ये हत्तीकर कुंटूबिय बेकायदेशीर व्यवसाय धंदे करतात म्हणजेच अनाधिकृत पणे, विनापरवाना व बेकायदेशीर देशी, विदेशी स्वरुपाचे मद्य विक्री करणे तसेच  परिसरात बेकायदेशीर  अवैध जुगार, तीनपानी पत्ते पैसे लावुन खेळणे तसेच अनेक बेकायदेशीर  व्यवसाय,धंदे तसेच लोकांना होणारे त्रास व गुंडगिरीबाबत कठोर कायदेशीर कारवाई  करण्याची मागणी या परिसरातील महिला नागरीक  शांता बाबासाहेब धुमाळ , सरस्वती फाल्गुन पुजारी व पद्मजा  मुरारी नराते चंचंदा भिमराव नराटे. सौ. चंदाकिमराव नरोट ,रेखा संजय मुधाळ...

जामेतुल बनात दारुल फलाह नेहरू नगर पिंपरी का सालाना जलसा कामयाब हर मोहल्ले मे बालिग लडकीयो का मक्तब मुस्लिम समाज की जरूरत ; मुफ्ती रईस कोंढवा

  पुणे मेट्रो लाईव्ह :  अन्वरअली शेख :  पिंपरी चिंचवड ता. 3 नेहरू नगर मे लडकीयो का दिनी मक्तब जिस मे कुरान,उर्दू और इस्लामी तालीम,अदब, तेहजिब की तालीम   देने का  काम मोलाना एहसान फैजी पिछले तीन सालो से अंजाम दे रहे है. आज मुस्लिम समाज की  सब से बडी जरुरत शिक्षा की हे ! इस्लाम धर्म मे शिक्षा,तालीम को बहुत महत्व दिया गया है,  https://youtu.be/10kl07GK6rA इस्लाम धर्म शिक्षा और तालीम के मामले में किसी भी तरह स्त्री और पुरुष मे भेदभाव नही करता हे, मेहमाने खास मुफ्ती रईस कोंडवा ने अपने मुख्य भाषण मे विचार प्रकट कीये. आगे मुफ्ती रईस ने कहा की आज मुस्लिम समाज की सब से बडी जरुरत बडी,बालीग लडकीयो के लिये हर मोहल्ले मे दिनी तालीम देने के लिये मक्तबो का इंताजाम करना बहुत ही जरुरी है,    मोलाना ऐहसान फैजी ने आये हुवे सभी मेहमानो का स्वागत किया, मुख्य मेहमान आमिना जी पानसरे (चाची ) कारी इकबाल उस्मानी, मदरसा फैजुल उलूम दापोडी, हाफीज अन्वरअली देहूरोड मदद फाऊंडेशन आदी मेहमान  कार्यक्रम मे मौजुद रहे,     मक्तब की छोटी बाच्चियो मे अपने इस्ला...

प्राचार्या श्रीमती आर.एल.निर्मळे मॅडम, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व छात्राध्यापक व छात्राध्यापिका यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप

प्रेस मीडिया लाईव्ह :  श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप , संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन ,(बी.एड) पेठ वडगाव .संस्थेचे संस्थापक श्री स्वर्गीय अशोकराव माने साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त सोमवार दिनांक 12.06 2023 रोजी "अवधूत विशेष मुलांची निवासी शाळा "अंबप येथे विद्यार्थ्याना कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड  महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती आर.एल.निर्मळे  मॅडम, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व छात्राध्यापक व छात्राध्यापिका यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  यावेळी अवधूत विशेष मुलांच्या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शिंदे मॅडम यांनी मतिमंद मुलांबद्दल माहिती दिली. तसेच त्यांचे संगोपन, स्वच्छ्ता, आहार, त्यांची ट्रिटमेंट औषधे, त्याची राहण्याची सोय, मुलांच्या व पालकांच्या समस्या, 18 वर्षाखालील विद्यार्थी व 18 वर्षांवरील विद्यार्थी तसेच शिक्षकांची जबाबदारी व शाळेची सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाच्या प्राचार्या  सौ आर.एल.निर्मळे- चौगुले यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणची माहिती घेतली.तसेच प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती घेवून त्यांना मार्गदर...

पुणे : येवलेवाडी येथे 63 वा महाराष्ट्र दिन वर्धापन सोहळा संपन्न

पुणे : येवलेवाडी येथे 63 वा महाराष्ट्र दिन वर्धापन सोहळा संपन्न पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे :  येवलेवाडी येथे आज दिनांक एक मे 2023 रोजी नवजीवन अंध अपंग कल्याण मंडळ संचालित प्रशिक्षण केंद्र येवलेवाडी येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रपती पदक विजेते माननीय श्री प्रकाश पाटील, ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री मुक्तार भाई सय्यद, सोल्जर आय यु फाउंडेशन माननीय श्री. तुषार बाळासाहेब कदम हे सन्माननीय पाहुणे उपस्थित होते.

पूर्व MLA सिमरजीत सिंह बैंस ने अदालत के सामने किया आत्मसमर्पण

 पूर्व विधायक और लोक इंसाफ पार्टी के प्रमुख सिमरजीत सिंह बैंस रेप का आरोप  सिमरजीत सिंह बैंस सहित 6 अन्य लोग भी आरोपी. पुणे मेट्रो लाईव्ह : लुधियाना :  और लोक  पार्टी के प्रमुख सिमरवजीत सिंह बैंस ने अदालत के सामने आत्मसमर्पण कर दिया है। इसकी पुष्टि संयुक्त आयुक्त रावचरण सिंह बराड़ ने की है। बता दें, 10 जुलाई 2021 को थाना डिविजन नंबर 6 पर बैंस और उनके साथियों के खिलाफ मामला दर्ज हुआ था। इस मामले में पीड़ित महिला ने पूर्व विधायक बैंस पर दुष्कर्म करने के आरोप लगाए थे। जिसके बाद बैंस पर धारा 376, 354, 354-A, 506 और 120/B के तहत मामला दर्ज किया गया था।  सिमरजीत की फैक्ट्री में छापेमारी पूर्व विधायक सिमरजीत सिंह बैंस सहित 6 अन्य लोग जिनमें कर्मजीत सिंह बैंस, परमजीत सिहं बैंस, सुखचैन सिंह, प्रदीप कुमार उर्फ गोगी, बलजिंदर कौर और जसबीर कौर आरोपी हैं। कर्मजीत सिंह,  सिमरजीत सिंह बैंस का भाई है जिसे इसी महीने 2 जुलाई को पुलिस ने गिरफ्तार कर लिया था। पुलिस ने कर्मजीत को सिमरजीत की फैक्ट्री में छापेमारी कर पकड़ा था। इस दौरान सिमरजीत सिंह फरार हो गया था।    ...

जल्द ही शिंदे गुट और उद्धव गुट में होगी सुलह: दीपाली

पुणे मेट्रो लाईव्ह : शिवसेना नेता दीपाली सय्यद ने ट्विटर पर बड़ा दावा किया है। उन्होंने कहा है कि जल्द ही शिंदे गुट और उद्धव गुट में सुलह हो जाएगी और इसमें बीजेपी मदद कर रही है। मराठी भाषा में किए गए ट्वीट में दीपाली ने लिखा, ' आने वाले दो दिनों मे उद्धव ठाकरे और एकनाथ शिंदे शिवसैनिकों की भावनाओं का आदर करते हुए पहली बार चर्चा के लिए एक साथ आएंगे, यह जानकर बहुत अच्छा लगा। एकनाथ शिंदे ने शिवसैनिकों की भावना समझी और उद्धव ठाकरेने परिवार के मुखिया होने के नाते ये बात दिल से निभाई, यह स्पष्ट हो गया है। इस मध्यस्थता के लिए भाजपा नेताओं ने मदद की, इसके लिए भी धन्यवाद। चर्चा कहां होगी अब उस जगह का इंतजार रहेगा । शिवसेना के बागी विधायकों ने गुवाहाटी में गुजारा बेहद मुश्किल समय: शिंदे बता दें कि इससे पहले महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने शनिवार को कहा था कि उनके साथ गुवाहाटी गए शिवसेना के बागी विधायकों ने बेहद मुश्किल और तनावपूर्ण समय बिताया। शिंदे ने कहा कि विधायकों ने जब अपने विद्रोह के बाद विभिन्न घटनाओं से संबंधित खबरें टीवी पर देखीं तो वे बेहद तनाव में आ गए और उनका वह समय बेहद ...

बेडकिहाळ येथे डॉ. विक्रम शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारोंच्या उपस्थितीत दिमाखात साजरा

बेडकिहाळ येथील आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद,            शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम. पुणे मेट्रो लाईव्ह :   बेडकिहाळ, ता,१६,  येथील कै बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या  वतीने शुक्रवार (ता १५) रोजी श्रीमती कुसुमावती  मिर्जी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विविध रोग तपासणी शिबिरास बेडकिहाळ सह परिसरातिल नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.        स्वागत शिंगाडे सेवाभावी संस्थेचे  संस्थापक डॉ विक्रम शिंगाडे यांनी केले, तर अजित कांबळे यांनी प्रास्ताविकात शिंगाडे चॅरिटेबलच्या वतीने  वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांनची सविस्तर पणे माहिती करून दिली.   या शिबिरा प्रसंगी  प्रमुख पाहुणे म्हणून  अनुराधा पाटील, पीएसआय (पालघर मुबंई,) डॉ सुनीता पाटील (सांगली )  कृषी पंडित सुरेश देसाई,, डॉ सुरेश कुराडे, (गडहिंग्लज) कारदगा ग्राम पंचायत अध्यक्ष राजू खिचडे, समाजकल्याण आधिकारी जे के पम्मार, आण्णा पाटील, आदी उपस्थीत होते.     उपस्थीत सर्...

शिवसेना पुणे शहर .... रास्ता रोको आंदोलन ... झुकेंगे नही ...

पुणे मेट्रो लाईव्ह : शिवसेना नेते, खा संजय राऊत साहेब यांच्यावर राजकीय सुडाने केंद्र सरकारने ईडी मार्फत कारवाई केली. आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राऊत साहेबांची तपास व चौकशी सुरू होती. पहिली नोटीस दिड महिन्यापूर्वीच दिली, चौकशी केली मग तेव्हाच का अटक केली नाही ? भाजपच्या विरोधात बोलणार त्याच्यावर ईडीची कारवाई.. भाजप मधे प्रवेश केला आणि काहीही गुन्हा असो तरीपण नो कारवाई .. ही कुठली हिटलरशाही ...  पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख बाळा  ओसवाल, डाॅ अमोल देवळेकर, आनंद गोयल, भरत कुंभारकर, विधानसभाप्रमुख अशोक हरणावळ, विशाल धनवडे, राजेंद्र बाबर, उत्तम भुजबळ, अर्जुन जानगवळी, राजेश मोरे, दिलीप पोमण, रूपेश पवार, मारूती ननावरे, चेतन चव्हान, अक्षय माळकर शशिकांत,दिपक घुबे, सचिन जोगदंड, सुरज लोखंडे, गौरव पापळ ,मदन गाडे, नितिन निगडे, सनि गवते, अतुल दिघे, निरंजन कुलकर्णी, अनिकेत थोरात, शंकर साठे, स्वाती कथलकर, श्रुती नाझीरकर, सरोज कारवेकर, रोहीणी कोल्हाळ, सिमा मगर, सलमा भाटकर, सिमा गायकवाड, पद्मा सोरटे, गायत्री गरूड, मुकुंद लालबिगे, अनिल माझिरे, रोहीत सांडभोर,